करण जोहरनं या पुस्तकात जे सांगितलंय, ते खरं सांगितलंय! जे नाही, ते नाही!
आज ‘नेपोटिझम’सारख्या त्याच्या एखाद्या पवित्र्यामुळे (स्टँड घेण्यामुळे) तो काहीसा टीकेचा धनी झाला असला, तरी पुस्तकातून डोकावणारा त्याचा प्रामाणिकपणा कुणीच नाकारू शकत नाही. कुठे काय बोलायचं नाही, हेही त्याला चांगलंच कळतं. ती कला त्यानं पुस्तकातही अर्थातच जपली आहे. त्यामुळे जे सांगितलंय, ते खरं सांगितलंय; पण म्हणून स्वत:बद्दल सगळं काही सांगितल्याचा दावा स्वत: करणचाही नाही.......